Sunday, February 10, 2008

विशाखा



इतक्यात कुसुमाग्रजांचे विशाखा नावाचे पुस्तक वाचले. कुसुमाग्रजांसारखे महान कवि महाराष्ट्राच्या भुमीवर होऊन गेलेत हे महाराष्ट्राचे भाग्य आहे.



मराठी भाषेशी जरा संपर्क कमी झाल्यामुळे मला आजकाल आकलन व्हायला जरा वेळ लागतो :)
पण जेवढ्या वेळा कविता वाचत गेले तेवढा जास्त त्यांचा अर्थ उलगडत गेला. पुस्तकातील सर्वच कविता सुंदर आहेत. त्यांचा आस्वाद घेण्यासाठी पुस्तक जरुर वाचा.



ह्या लेखाचा शेवट कुसुमाग्रजांच्या कवितेतील एका कडव्यानेच करते-
कोठे ना जिवास मायेची ओढ
नाही वा मुळीही ध्येयाची जोड
सार्थता जिविता नाही
भकास दिशा या दाही
कशास आयुष्य देवा, इतुके
शतकामागून जाती शतके.